संवाद
झुकल्या वाकल्या गर्विष्ठ माना...!
- अमरजित पाटील.
संस्थापक, कर्मवीर औदुंबरआण्णा पाटील प्रतिष्ठान, पंढरपूर, महाराष्ट्र
☎️ 9850981009
✍🏻
प्रसंग पहिला
दिनांक - ५ फेब्रुवारी २००१,
स्थळ - कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय, पंढरपुर, महाराष्ट्र.
कार्यक्रम - 'जिमखाना डे' चा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ.
वेळ - सकाळी ११:३०
(महाविद्यालय परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त हजर आहे)
पंढरपुरमधील रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटिल महाविद्यालयाचा 'जिमखाना डे' चा वार्षिक कार्यक्रम सुरु झाला होता. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे/वक्ते म्हणून तथाकथित शिवशाहीर ब. मो. तथा बाबासाहेब पुरंदरे हे उपस्थित होते. बाबासाहेब पुरंदरे हे भाषण करण्यासाठी उभे राहिले ते "जय भवानी...! जय शिवाजी....!" या घोषणांच्या निनादात बाबासाहेब पुरंदरे हे डायसवर पोहचले, तोच एक विद्यार्थी कुणाच्या लक्षात येण्याच्या आत डायसजवळ गेला आणि बाबासाहेब पुरंदरे यांच्या हातात एक कागद दिला. बाबासाहेब पुरंदरेनी कागद पहिला व चूरगाळून फेकून दिला आणि हिटलर, मुसोलिनी यांची नावे घेत आपले भाषण सुरु केले. बाबासाहेब बराच वेळ बोलत राहिले.
पण....तेवढ्यात अचानक विद्यार्थ्यांमधून आवाज आला......."बाबासाहेब पोथी-पुराण बंद करा आणि शिवजयंतीच्या तारीख-तिथि वादाचा खुलासा करा...!" तसे बाबासाहेब हडबडले...आणि "मी या परिस्थितीत भाषण करू शकत नाही" असे म्हणाले आणि आपल्या जागेवर रागाने जाऊन बसले. महाविद्यालयाचे प्राचार्य बोलायला उभा राहिले आणि "ज्यांना कार्यक्रमासाठी बसायचे नाही अशा विद्यार्थ्यांनी बाहेर जावे."असे फर्मावले. बाबासाहेबांना पुन्हा भाषण सुरु करण्याची विनंती केली. बाबासाहेब पुन्हा भाषणाला काही झालेच नाही या अविर्भावात उभे राहिले. आणि.....सभा मंडपात एकच आवाज दणाणला आणि तो होता... "जय जिजाऊ...! जय शिवराय...!" "शिवजयंती तारीख-तिथीचा वाद लावणार्या बाबा पुरंदरेचा धिक्कार असो....!" आणि सभेत मागील खुर्च्या पुढे जावून पडू लागल्या.
पोलिसांनी फास आवळला. पत्रकारांच्या नजरा, कॅमेरा गोंधळाच्या दिशेने वळले. कोणालाच काय घडत आहे समजत नव्हते आणि आवाज घुमला "अरे....आवाज कुणाचा..." प्रति आवाज आला "संभाजी ब्रिगेडचा" होय......संभाजी ब्रिगेडचा...! हेच माझ्या आयुष्यातिल पहिले आंदोलन. मी आणि माझ्या सहकार्यानी ब्राह्मणशाहीला दिलेला पहिला दणका...!
महाराष्ट्र व देशामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल ब्राम्हणांनी अनेक वाद निर्माण करुन ठेवले आहेत. त्यामधील एक वाद म्हणजे 'छत्रपति शिवाजी महाराजांच्या जन्म तारखेचा वाद' होय. या वादाची पार्श्वभूमी सर्वप्रथम आपण पाहु या. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मतिथीच्या वादाची सुरूवात भटमान्य टिळकाने केली. हा वाद अनेक वर्ष सुरु राहिला आणि १९६६ साली मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी इतिहास अभ्यासकाची एक समिती नेमली. या समितीमध्ये न. र. फाटक, ग. ह. खरे, वा. सी. बेंद्रे, दत्तो वामन पोतदार, डॉ.आप्पासाहेब पवार आणि ब. मो. म्हणजे बाबासाहेब पुरंदरे यांचा समावेश होता. या समितीने शासनाच्या पैशाचा अनेक वर्ष चुराडा केल्यानंतर फाल्गुन वद्य तृतीय या तिथीच्या बाजूने आपला निर्णय दिला. नेमके त्याच वेळेला मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेड यांनी शिवजयंती तारखेने साजरी केली जावी, अशी मागणी शासनाकडे लावून धरली होती. १९९५ सालापासून मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेड व इतर बहुजन संस्था आणि संघटना दि.१९ फेब्रुवारी रोजी शिवजयंती साजरी करण्यास सुरवात केली होती. शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर शासनाने १५ फेब्रुवारी २००० च्या जी. आर. द्वारे शिवजयंतीची दि.१९ फेब्रुवारी ही शासकीय समितीने मान्य केलेली तारीख मान्य करुन जाहिर केली.
पण यामुळे शिवचरित्र वादग्रस्त ठेवण्याच्या ब्राम्हणांच्या षडयंत्रावर पाणी पडले होते. म्हणून कालनिर्णय कॅलेंडरचे साळगावकर यांनी वर्तमानपत्रात मोठमोठ्या जहिराती देऊन 'शिवजयंती दि.१२ मार्च रोजीच' या स्वरुपाचे आवाहन केले. आपल्या मुद्दयांच्या समर्थनासाठी अनेक इतिहास अभ्यासकांची पत्रे प्रसिद्ध केली. त्या पत्रात पहिले पत्र बाबासाहेब पुरंदरे यांचे होते. बाबासाहेब पुरंदरे यांनी शासनाच्या समितीत असताना दि.१९ फेब्रुवारी च्या बाजूने आपले मत दिले होते आणि बाहेर मात्र आपला बामनीकावा दाखवत तिथीचे समर्थन केले होते.
याच पार्श्वभूमीवर आम्ही महाविद्यालयात रितसर निवेदन देवून खुलासा करण्याची मागणी केली होती. पण आमच्या मागणीचा कागद फेकून देत त्यांनी आपली जात दाखवली. त्याचा परिणाम वरील प्रसंग घडण्यापर्यंत गेला. कार्यक्रमाच्या ठिकाणी गोंधळ घातला म्हणून आम्हाला पोलिसानी महाविद्यालयातुन बाहेर काढले. आम्ही महाविद्यालयाच्या गेटवर घोषणाबाजी चालू केली. बाबासाहेब पुरंदरेची गाडी बाहेर जाऊ न देण्याचे ठरले. परिस्थिति हाताबाहेर जात असल्याचे पोलिसाच्या लक्षात आले. त्यांनी आमच्याशी संपर्क साधला व शिवजयंतीच्या तारीख-तिथी वादाचा खुलासा केल्याशिवाय आम्ही बाबासाहेब पुरंदरेची गाडी बाहेर जाऊ देणार नसल्याचा निर्धार बोलुन दाखवला. पोलिसानी मध्यस्थी करण्याचे मान्य करुन बाबासाहेबाना आमचा निरोप दिला. बाबासाहेबानी आम्हाला विश्रामग्रहावर पाच मिनिट वेळ देण्याचे मान्य केले आणि नेमके बाबासाहेब पुरंदरे इथेच आमच्या जात्यात अडकले....!
विश्रामगृहावर जबरदस्त पोलिस बंदोबस्त लावण्यात आला होता. आम्ही साधारण १०० ते १५० कार्यकर्ते अगोदरच विश्रामगृहावर पोहचलो होतो. पोलिस बंदोबस्तात बाबासाहेब पुरंदरे यांचे आगमन झाले. मी त्यांना बसण्यासाठी खुर्ची दिली आणि मी बाबासाहेब पुरंदरेना प्रश्न विचारण्यास सुरवात केली.
मी - आपण शासनाने नियुक्त केलेल्या शिवजयंतीच्या तारीख निश्चिती करण्याच्या समितीमध्ये होता. त्यावेळेस आपण दि.१९ फेब्रुवारी च्या बाजूने आपले मत दिले होते आणि आता आपण कालनिर्णय कॅलेंडरचे साळगावकर यांनी वर्तमानपत्रात मोठमोठ्या जाहिराती देऊन 'शिवजयंती दि.१२ मार्च रोजीच' या स्वरुपाचे अवाहन केले त्याच्या समर्थनार्थ पत्र दिले आहे. त्यामुळे शिवप्रेमींमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. मग शिवप्रेमींनी कोणती शिवजयंती साजरी करावी?
बाबासाहेब पुरंदरे - छत्रपति शिवाजी महाराज हे आपले राम, कृष्ण याप्रमाणे दैवत आहेत. ज्याप्रमाणे आपण राम, कृष्ण यांची जयंती तिथीने साजरी करतो. त्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तिथीने साजरी केली पाहिजे, असे माझे मत मी शासनास कळविले आहे.
मी - पण आपण तर शासनाच्या अहवालात तारखेची बाजु घेतली आहे आणि राम, कृष्ण हे देवपुरुष आहेत आणि शिवाजी महाराज हे महापुरुष आहेत. त्यांची तुलना आम्हाला मान्य नाही. (या मुद्द्यावर बाबासाहेब हडबडले)
बाबासाहेब पुरंदरे - ते माझे सार्वजनिक मत आहे. हे माझे व्यक्तिगत मत आहे.
मी - मग यापैकि कोणत्या मताने आम्ही शिवजयंती साजरी करावी.
बाबासाहेब पुरंदरे - अर्थातच तिथीने साजरी केली पाहिजे. कारण आपण हिंदू आहोत आणि हिंदुनी प्रत्येक सण तिथीने साजरा केला पाहिजे आणि शिवाजी महाराज हे हिंदू पदपादशाह आहेत.
मी - जर शिवाजी महाराज हे हिंदू पदपादशाह आहेत. तर मग ब्राम्हणांनी त्यांच्या राज्याभिषेकाला विरोध का केला ? आणि स्वत: शिवाजी महाराजांनी आपणाला हिंदू पदपादशाह असे कधीच म्हणून घेतले नाही आणि तिथीने जयंती साजरी करण्यासाठी फक्त शिवाजी महाराजच अपवाद का? सावरकर, टिळक आणि इतर नेत्याची जयंती तारखेने साजरी का करतात?
बाबासाहेब पुरंदरे - (या प्रश्नावर बाबासाहेब भलतेच अडचणीत आले) त्याचे काय आहे. ज्यांचा जन्म स्वातंत्र्यपूर्व झाला आहे. त्यांची जयंती तिथीने केली जाते आणि स्वातंत्र्यानंतर ज्यांचा जन्म झाला आहे. त्यांची जयंती तारखेने केली जाते.(बाबासाहेब प्रचंड दबावखाली आल्यामुले काहीही उत्तरे देऊ लागले आणि सारखे आपल्या अंगरक्षकाकडे पाहू लागले.)
मी - मग आपला आणि सावरकर, टिळकांचा जन्म केंव्हाचा आहे ? (या प्रश्नावर बाबासाहेब उसळले आणि म्हणाले )
बाबासाहेब पुरंदरे - जयंती ही मेल्यानंतर साजरी करतात आणि आपण मला मयताच्या यादीत सामिल करत आहात.
मी - तो भाग महत्वाचा नाही. मुद्दा हा आहे की जर तिथीनेचा जयंती साजरी करायची तर शिवाजी महाराजच अपवाद का ? आणि जयंती तिथीने साजरी करायची तर राज्याभिषेक तारखेने का साजरा केला जातो. (येथे शिवप्रेमींनी एक मुद्दा लक्षात घ्यावा. ब्राम्हण २००१ सालाच्या आगोदर तारखेने राज्याभिषेक साजरा करत होते. पंढरपुर मधील बाराभाई तालमीतील तरुण २००१ पूर्वी अनेक वेळा तारखेच्या राज्याभिषेक सोहळ्यासाठी हजर राहिलेले आहेत आणि महत्वाचे म्हणजे बाबासाहेब पुरंदरे या वेळी हजर असत. शिवजयंतीची तारीख निश्चित झाल्या नंतर ब्राम्हणांनी डावपेच बदलला आणि राज्याभिषेक तिथीने साजरा करण्यास सुरवात केली आणि नवीन वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला. पण तो कोल्हापुरचे युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी शिवराज्याभिषेक प्रतिवर्षी दि. ६ जून ला साजरा करुन मोडित काढला.)
बाबासाहेब पुरंदरे - (थरथरत) कोण म्हणत शिवराज्याभिषेक तारखेने साजरा होतो ?(मी बाबासाहेब पुरंदरेच्या पुढे बाराभाई तालमीतील तरुण उभे केले. मग बाबासाहेब पुरंदरेची बोलतीच बंद झाली.)
मी - बाबासाहेब मला सांगा, तिथीनुसार कोणताही कार्यक्रम घ्यावयाचा झाल्यास तारीख बदलत रहते हे खरे आहे का ?
बाबासाहेब पुरंदरे - (सावधपणे) हो, कारण आपल्या पंचाग नुसार २१/ २२ दिवसांचा फरक पडतो. त्यामुळे तारीख एक न येता बदलत राहते.
मी - मग आपण गेली अनेक वर्ष दि. ६ जून रोजीच रायगडावर काय करत असता ?(बाबासाहेब पूर्ण गोंधळून गेले होते, हताश झाले होते.)
बाबासाहेब पुरंदरे - (या प्रश्नाचे उत्तर न देताचा उठण्याचा प्रयत्न करू लागले.)
मी - बाबासाहेब आपणाला विनंती आहे की चर्चा अजुन संपलेली नाही तरी आपण बसून राहावे. अन्यथा निर्माण होणार्या परिस्थितीला आपण जबाबदार राहाल.(मग मात्र बाबासाहेब पुरंदरे आपल्या जागेवर बसले.)
मी - आपण जाणीवपूर्वक शिवजयंती तारीख-तिथीचा वाद निर्माण केला आहे. असा आमचा आपल्यावर आरोप आहे. त्या बद्दल आपले काय म्हणणे आहे ?
बाबासाहेब पुरंदरे - (अत्यंत हताशपणे)हवे तर तसे समजा....!
मी - या आपल्या कृत्याबद्दल आपण समस्त शिवप्रेमींची माफी मागितली पाहिजे.
बाबासाहेब पुरंदरे - मी आपली माफी मागतो.
मी - आपण आता मागितलेली माफी आम्हाला लेखी द्यावी लागेल.
बाबासाहेब पुरंदरे - (यावर मात्र त्यांचा राग अनावर झाला) हा...हा...तर..! सरळ सरळ बलात्कार आहे. बळजबरी आहे.(वातावरण एकदम तंग झाले)
मी - (मोठ्याने) तुम्हाला, माफीनामा लिहून द्यावाच लागेल आणि राहिली बाब बलात्कार, बळजबरी करण्याची तर आम्ही ती अजुन केलेली नाही. आपली इच्छा असेल तर त्याचा ही नमूना दाखवतो.....!
आणि...मग मात्र....वाकल्या गर्विष्ठ माना.....या शिवमंदिरी...!
बाबासाहेब पुरंदरेच्या आयुष्यातील ही पहिली हार होती आणि आम्ही ब्राह्मणांना दिलेली पहिली मात. यानंतर बाबासाहेब पुरंदरे या नावाचे गारुड बहुजन समाजाच्या मनावरुन कमी-कमी होत गेले. बाबासाहेब पुरंदरेच्या मागे शिवदशा लागली ती आजपर्यंत कायम आहे. या दिवसी माझा वाढदिवस असतो. तो आम्ही बाबासाहेब पुरंदरेचा माफीनामा घेवुन साजरा केला. अजुन असे अनेक वाढदिवस मला साजरे करायला आवडेल.
जय जिजाऊ ! जय शिवराय !!
सोबत - बाबा पुरंदरेचा स्वत:च्या हस्ताक्षरा मधील माफीनामा !